TIN24 | Editor – Amit Alhatदिनांक : 26 नोव्हेंबर – संविधान दिन भारताच्या लोकशाहीचा महत्वाचा पाया घालणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेल्या भारतीय संविधानाला आज २६ नोव्हेंबर रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवसाला ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करताना राष्ट्र पुन्हा एकदा त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा, संघर्षाचा आणि दूरदृष्टीचा गौरव करत आहे. डॉ. आंबेडकर हे भारतीय काँग्रेसचे केंद्रीय कायदेमंत्री म्हणून तसेच संविधान मसूदा समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. अत्यल्प कालावधीत, विविध समाजघटक, विविधता आणि असमानता असलेल्या देशासाठी सर्वसमावेशक, आधुनिक आणि जगातील सर्वाधिक प्रगत असे संविधान तयार करणे ही अत्यंत कठीण जबाबदारी होती. मात्र डॉ. आंबेडकरांनी ही जबाबदारी अत्यंत निष्ठेने, कठोर परिश्रमांनी आणि विद्वत्तेने पार पाडली. संविधान निर्मितीचा संघर्षमय इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळात समाजातील भेदभाव, अत्याचार, अस्पृश्यता आणि सामाजिक असमानता दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी आजीवन संघर्ष केला.त्यांनी लाखो वंचित, शोषित आणि दुर्लक्षित वर्गाला घटनात्मक हक्क देण्यासाठी